● गुमी (द. कोरिया) येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय पथकाने आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेची एकूण 24 पदकांसह सांगता केली.
● अखेरच्या दिवशी नवा राष्ट्रीय, वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह सहा पदके जिंकण्यात भारतीय खेळाडूंना यश आले.
● यापैकी भालाफेकीत सचिन यादव, 5000 मीटर शर्यतीत पारुल चौधरी आणि महिला 4 बाद 100 रिले संघाने रौप्यपदक पटकावले, तसेच अनिमेष कुजुरने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीतील भारताचा दशकभरापासूनच पदकदुष्काळ संपवला.
● भारताने गेल्या स्पर्धेच्या (२०२३ मध्ये सहा) तुलनेत यंदा (आठ) अधिक सुवर्णपदके पटकावली. मात्र, एकूण पदकांच्या बाबतीत गतस्पर्धेतील कामगिरी मागे टाकण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले.
● गेल्या स्पर्धेत भारताने 27 पदके मिळवली होती तर यावेळेस 24 पदके पटकावली .
पदकतक्ता
देश सुवर्ण रौप्य ब्राँझ
चीन १५ ८ ३
भारत ८ १० ६
जपान ४ १० १०
कझाकस्तान २ १ २