Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पश्चिम बंगाल सर्वाधिक जलसमृद्ध राज्य

  • Home
  • Current Affairs
  • पश्चिम बंगाल सर्वाधिक जलसमृद्ध राज्य

देशात प्रथमच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलगणना करण्यात आली

पहिल्या जलाशय गणनेमध्ये देशात सर्वाधिक जलसमृद्ध राज्य म्हणून पश्चिम बंगाल या राज्याची निवड करण्यात आली.

पश्चिम बंगाल बरोबरच उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश , ओडिशा आणि आसाम ही राज्य देखील पाण्याबाबत समृद्ध आहेत .

या पहिल्या जलगणनेमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित तळी, तलाव आणि इतर जलस्त्रोतांचा समावेश असलेली जलसंसाधने आणि जलस्त्रोतांच्या अतिक्रमणाबाबतची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील जलस्त्रोत जलाशयांचा समावेश आहे .

वापरत असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या जलस्त्रोत जलाशयांची गणना केली गेली .

जलसिंचन, उद्योग ,मत्स्यपालन ,घरगुती/पिण्याचे पाणी ,मनोरंजनात्मक वापर ,धार्मिक भूजल पुनर्भरण या जलस्त्रोतांच्या सर्व प्रकारच्या वापराचाही या गणनेत विचार करण्यात आला आहे .

ही गणना यशस्वीरित्या पूर्ण झाली असून अखिल भारतीय आणि राज्यनिहाय अहवाल प्रकाशित करण्यात आले आहे.

सर्वाधिक जलसमृद्ध असलेली राज्ये:

1) पश्चिम बंगाल

2)उत्तर प्रदेश

3)आंध्र प्रदेश

4)ओडिशा

5)आसाम

शहरी भागात सर्वाधिक जलसाठे असणारी राज्ये:

1) पश्चिम बंगाल

2) तामिळनाडू

3) केरळ

4)उत्तर प्रदेश

5) त्रिपुरा

ग्रामीण भागात सर्वाधिक जलसाठे असणारी राज्ये:

1) पश्चिम बंगाल

2)उत्तर प्रदेश

3) आंध्र प्रदेश

4) ओडिशा

5) आसाम

महाराष्ट्रातील स्थिती:

पहिल्या जलगणनेत राज्यात 97,062 जलसंस्थांची नोंद

राज्यातील जलसाठ्यांपैकी 99.3% म्हणजे 96,343 साठे ग्रामीण भागात

शहरी भागात फक्त 0.7 % म्हणजे 719 साठे

बहुतेक जलसाठे म्हणजे जलसंवर्धन योजना

राज्यातील जलसाठ्यांपैकी 99.7% साठे सरकारी मालकीचे

देशातील जलसाठ्यांची संख्या:

गणना झालेले देशातील जलसाठे : 24,24,540

ग्रामीण भागातील एकूण जलसाठे : 23, 55,055

शहरी भागातील जलसाठे : 69,485

मानवनिर्मित जलसाठे : 78%

नैसर्गिक जलसाठे : 22 %

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *