- केंद्र सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
- हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष यातना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करून देईल.
- त्या काळात, स्वतःचा कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज दडपून टाकण्यात आला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश, अत्याचारी सरकारच्या हातून अक्षम्य छळ सहन करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या लाखो लोकांच्या आत्म्याचा सन्मान करण्याचा असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.
- ‘संविधान हत्या दिवस’ साजरा केल्याने आपल्या लोकशाहीचचे संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याची चिरंतन ज्योत प्रत्येक भारतीयांमध्ये तेवत ठेवण्यात मदत होईल, अशा रीतीने कोणत्याही हुकूमशाही शक्तीला या भयावहतेची पुनरावृत्ती होण्यापासून रोखता येईल.