Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावले

भारतीय महिला बॅडमिंटन संघाने मलेशियामध्ये शाह आलम या ठिकाणी झालेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या महिलांनी अंतिम फेरीच्या लढतीत थायलंडचे कडवे आव्हान 3 – 2 असे परतवून लावत पहिल्यांदाच ही आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.

अधिक माहिती
● भारताने पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली, हे विशेष.
● पी. व्ही. सिंधू हिचा अनुभव, ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचा दमदार खेळ व युवा अनमोल खरब हिचा धाडसी खेळ, याच जोरावर भारतीय महिला संघाने देदीप्यमान कामगिरी केली.
● याआधी भारताच्या पुरुष संघाने दोन वेळा कांस्यपदक पटकावले होते.
● भारताने आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत तिसरे पदक मिळवले.
● यापूर्वी, भारतीय पुरुष संघाने 2016 आणि 2020 मध्ये बकांस्यपदक मिळवले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *