- महाराष्ट्रातील इथेनॉल प्रकल्पांनी यावर्षी एकूण 244 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे.
- इथेनॉल निर्मितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 18 कोटी लिटरने वाढ झाली आहे.
- गेल्या वर्षी राज्यात 226 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती.
- यावर्षी ऊस गळीत हंगामात राज्यातील साखर उत्पादन कमी होऊन इथेनॉल उत्पादनात भरीव वाढ झाली आहे.
- चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांनी मिळून एकूण 16 लाख टन साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वर्ग केली आहे.
- यामुळेच यावर्षी इथेनॉलचे विक्रमी उत्पादन झाले आहे.
- पूर्वी साखर कारखान्यांमध्ये फक्त साखरेचेच उत्पादन होत होते आता साखर कारखान्यांमधून वीज, आसवानी, इथेनॉल, बायोगॅस इत्यादी प्रमुख उपपदार्थांसह सुमारे 35 उपपदार्थांची निर्मिती करणे शक्य झाले आहे.
- साखर कारखाने आता इंधन निर्मितीचे कारखाने होऊ लागले आहेत.
- कापूस, सोयाबीन नंतर ऊस हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक झाले आहे
राज्यातील इथेनॉल निर्मिती दृष्टिक्षेपात:
- राज्यातील एकूण इथेनॉल निर्मिती प्रकल्प : 163
- सहकारी साखर कारखान्याचे प्रकल्प: 54
- खाजगी साखर कारखान्याचे प्रकल्प: 71
- स्वतंत्र प्रकल्प: 38
- प्रकल्पासाठी गुंतवणूक: 21,371 कोटी
तीन वर्षातील इथेनॉलची मागणी व पुरवठा:


