Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाच्या चौकशीसाठी समिती स्थापन

महाराष्ट्र केसरीतील वादग्रस्त निकालाच्या चौकशीसाठी समिती स्थापन

 

  • महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी गटाच्या गादी विभागातील शिवराज राक्षे वि. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालाची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने घेतला आहे.
  • फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस अहिल्यानगर येथे ही स्पर्धा झाली होती.
  • या लढतीत पंचांनी शिवराज राक्षेला चीतपट देण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता.
  • त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताबही पटकावला. मात्र, राक्षेला चीतपट देण्याचा निर्णय आजही चर्चेत असून पंचांच्या चुकीमुळेच मोहोळ जिंकला असा आरोप होत आहे.
  • या निर्णयानंतर रागाच्या भरात पंचांना मारहाण करणाऱ्या राक्षेवर राज्य कुस्तीगीर संघाने तीन वर्षाची बंदी घातली.
  • या प्रकरणानंतर किताब लढतीनंतर कुस्ती संघाने स्वतःहून राक्षे आणि मोहोळ यांच्यातील सामन्याच्या चौकशी करिता समिती नेमण्याचा निर्णय घेतला .
  • आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश गुंड, सुनील देशमुख, नामदेव बडदरे आणि विशाल बलकवडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
  • या समितीला 28 फेब्रुवारीपर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी दिली.
  • गादी विभागातील या अंतिम लढतीसाठी छत्रपती संभाजीनगरचे अनुभवी पंच म्हणून नितेश काबुलिया, तर मॅट व्यवस्थापक म्हणून दत्तात्रय माने, दुसरे पंच म्हणून विवेक नाईकल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *