Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मुंबईला 42 वे रणजी विजेतेपद

मुंबईने विदर्भाची झुंज मोडून काढताना 42 व्यांदा रणजी करंडक उंचावण्याचे आपले आठ वर्षांपासूनचे स्वप्न साकार केले. ऑफ – स्पिनर तनुष कोटियनच्या (4/95) प्रभावी माऱ्यामुळे मुंबईने अंतिम सामन्यात 169 धावांनी विजय साकारला.

• विजेता – मुंबई
• उप विजेता – विदर्भ
• अंतिम सामना – मुंबई
• सहभागी संघ – 38

मुशीर सामन्यात, तर तनुष स्पर्धेत सर्वोत्तम
• अष्टपैलू कामगिरीबद्दल मुशीर खानची अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी निवड झाली.
• तर यंदाच्या रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मुंबईचा अष्टपैलू तनुष कोटियनला मिळाला.
• मुशीरने अंतिम सामन्याच् दुसऱ्या डावात 136 धावांची खेळी केली आणि मोक्याच्या क्षणी दोन गडी बाद केले.
• दुसरीकडे, तनुषने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी करताना 10 सामन्यांत 29 बळी मिळवले आणि फलंदाज म्हणून 502 धावांचे योगदान दिले.

‘एमसीए’कडून पाच कोटी
• मुंबईने रणजी करंडक पटकावलाच, शिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) विजेत्या संघाला मिळणारे पाच कोटी रुपयेही आपल्या नावे केले.
• यासह मुंबई क्रिकेट संघटनेनेही (एमसीए) आपल्या विजेत्या संघाला पाच कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
• “एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि कार्यकारी परिषदेने मिळून रणजी विजेत्या मुंबई संघाला आणखी पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

रणजी करंडक
• रणजी करंडक ही भारतात खेळली जाणारी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी प्रमुख देशांतर्गत प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे .
• प्रादेशिक आणि राज्य क्रिकेट संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे संघ सहभागी होतात.
• BCCI ने 1934 मध्ये चॅम्पियनशिपची स्थापना केली, तेव्हापासून ती भारतातील विविध मैदाने आणि स्टेडियमवर आयोजित केली जात आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *