- ज्योती सुरेखा, अदिती स्वामी आणि परणीत कौर या भारतीय संघाने वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेतील महिलांच्या कम्पाउंडमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक साध्य केली.
- भारतीय महिला संघाने जागतिक कम्पाउंडमधील वर्चस्व तिसऱ्या टप्प्याची स्पर्धा जिंकून अधोरेखित केले.
- भारतीय संघाने पात्रता फेरीत अव्वल क्रमांक मिळवला होता.
- त्यांनी इस्टोनियाचा अंतिम लढतीत 232-229 असा एकतर्फी पराभव केला.
- भारतीय संघाने यापूर्वी शांघाय येथील पहिल्या टप्प्याच्या स्पर्धेत आणि येचेऑन येथील दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत विजेतेपद जिंकले होते.
- वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघ आतापर्यंत अपराजित आहे.
- या स्पर्धा तुर्की मधील अंताल्या या ठिकाणी पार पडल्या.