- विविध संघर्षग्रस्त देशांत प्राणाची बाजी लावून लढा देताना हुतात्मा झालेल्या शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात एक स्मारक भिंत बनवण्यात येणार आहे.
- भारताने याविषयी मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने 15 जून 2023 रोजी एकमताने मंजूर केला आहे.
- संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी यूएनजीएमध्ये ‘मेमोरियल वॉल फॉर फॉलन युनायटेड नेशन्स पीसकिपर्स’ नावाने मसुदा प्रस्ताव सादर केला.
- न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयात शहीद शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्य भिंत साकारणार आहे.
- या भिंतीवर बलिदान देणाऱ्या जवानांची नावे असणार आहेत.
- शांतता अभियानात भारताचे 6,000 सैनिक आहेत.
- संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानात भारत हा तिसरा सर्वाधिक योगदान देणारा देश आहे.
- मध्य आफ्रिकन गणराज्य, सायप्रस, कांगो, लेबनॉन, आखातासह विविध देशांत भारताचे 6,000 हुन अधिक सैनिक व पोलीस शांतता अभियानात सहभागी आहेत.
- आतापर्यंत 170 भारतीय सैनिकांनी बलिदानही दिले आहे. भारताच्या शहिदांची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.


