Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सैन्य दिन (आर्मी डे)

सैन्य दिन (आर्मी डे)

सैन्य दिन (आर्मी डे)

  • आधुनिकभारतीय सैन्याची सुरुवात 1 एप्रिल 1895 रोजी झाली. त्यावेळी भारताला गुलाम बनवणाऱ्या ब्रिटिश कंपनी ईस्ट इंडिया कंपनीने प्रेसिडेन्सी आर्मी म्हणून त्याची उभारणी केली होती.जी नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी म्हणून ओळखली जाऊ लागली.
  • दीर्घसंघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारतीय सैन्य म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु 15 जानेवारी 1949 पर्यंत त्याचे कमांडर ब्रिटिश लष्करी अधिकारी जनरल फ्रान्सिस बुचर होते.
  • आजारपणानंतर15 जानेवारी 1949 रोजी पहिले भारतीय लष्करप्रमुख मिळाले. ज्यांचे नाव फील्ड मार्शल केएम करिअप्पा होते.
  • त्यामुळे 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सैन्य दिनाचे वैशिष्ट्ये:

  • 77 वासैन्य दिन पुणे येथे साजरा केला जात आहे.
  • दिल्लीतीलकरियप्पा ग्राउंडवर होणारी आर्मी डे परेड आता विविध शहरांमध्ये हलवण्याचा निर्णय भारतीय सैन्याने घेतला आहे.
  • 2023 सालीबंगळुरूमध्ये आणि 2024 मध्ये लखनौमध्ये परेड आयोजित करण्यात आली होती.
  • यावर्षी (2025) पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
  • पुणेहे भारताच्या लष्करी इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे.
  • येथेराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि साउदर्न कमांडचे मुख्यालय आहे. याशिवाय, मराठा साम्राज्याशी असलेली ऐतिहासिक नाळ आणि सैनिकी प्रशिक्षणासाठीचे केंद्र म्हणून पुण्याचा विशेष सन्मान आहे.
  • पुण्यातीलबॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) आणि सेंटर येथे ही परेड होत आहे.
  • सरंक्षणमंत्रीराजनाथ सिंग देखील या परेडला उपस्थित राहतील
  • थीम: ‘आधुनिकीकरण, सर्वसमावेशकता आणि सार्वजनिक सहभाग’

राज्य क्रीडा दिन

  • हेलसींकीयेथील ऑलिंम्पीक स्पर्धत(1952) वैयक्तीक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक जिंकून देणारे(कांस्य) खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय हवामान खात्याला 150 वर्ष पूर्ण

  • पाऊसमोजण्याच्या तुरळक केंद्रापासून आज जगातील विख्यात अशा हवामान केंद्रापर्यंत भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मजल मारली आहे.
  • 15 जानेवारी2025 रोजी भारतीय हवामान खात्याला दीडशे वर्षे पूर्ण झाली.
  • देशात1864 मध्ये आलेले भीषण चक्रीवादळ, 1866 आणि 1871 मध्ये मान्सूनने घातलेला धुमाकूळ या पार्श्वभूमीवर ‘आयएमडी'(India Meteorological Department)  ची 15 जानेवारी 1875 रोजी स्थापना करण्यात आली.
  • पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी  शास्त्रज्ञांना भूकंपांबाबत सूचना देणारी प्रणाली विकसित करण्याचे आवाहन केले. यावेळी मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रगत तंत्रज्ञानामुळे चक्रीवादळांमुळे होणारे नुकसान तसेच आर्थिक नुकसान कमी झाल्याचे म्हटले आहे.
  • आयएमडीला150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ‘भारताच्या वैज्ञानिक वाटचालीचे प्रतीक’ अशा शब्दात संस्थेचा गौरव केला आहे.
  • यावेळीत्यांनी हवामान बदला संदर्भात जागरूकता निर्माण करण्याकरता मिशन ‘मौसम अभियानाचे’ अनावरण केले.
  • मोदीयांच्या हस्ते यावेळी टपाल तिकीट आणि एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले.
  • ‘आयएमडी’ चेमहासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा  हे आहेत.

जसप्रीत बुमराह ठरला सर्वोत्तम खेळाडू

  • आंतरराष्ट्रीयक्रिकेट परिषदेचा डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला जाहीर झाला आहे.
  • बॉर्डर-गावस्करकरंडक कसोटी क्रिकेट मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीमुळे त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली.
  • आयसीसीनेदिलेल्या माहितीनुसार या पुरस्काराच्या शर्यतीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डॅन पीटरसन यांना मागे टाकले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *