Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शमिभा पाटील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार

शमिभा पाटील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार

शमिभा पाटील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार

  • रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.
  • राज्याच्या 64 वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • रावेर मतदारसंघातील केळी मजुरांच्या समस्यांसाठी केळी मजूर विकास महामंडळाचा मुख्य मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शमिभा पाटील यांनी – सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
  • मागील 15 वर्षांपासून शमिभा पाटील तृथीयपंथींसह आदिवासी व भटक्यांच्या हक्कासाठी लढत असून, पाच वर्षांपासून त्या वंचित बहुजन आघाडीचे काम करीत आहेत.

शमिभा यांच्याविषयी

  • भुसावळ येथील रहिवासी असलेल्या शमिभा पाटील यांचे मूळ नाव श्याम भानुदास पाटील असे आहे.
  • फैजपूर येथून त्यांनी एम. ए. मराठीची पदवी घेतली. सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएच.डी. करीत आहेत.
  • त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी अर्थात, नऊ वर्षांपूर्वी तृतीयपंथी असल्याचे जाहीर केले.
  • 2014 मध्ये त्यांना तृतीयपंथी म्हणून नागरिकत्वदेखील मिळाले.
  • तेव्हापासून त्या तृतीयपंथींच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत.
  • पोलिस भरतीमध्ये तृतीयपंथींना आरक्षण मिळण्यासाठीदेखील त्यांनी न्यायालयीन लढा दिलेला आहे.

शबनम पहिल्या खासदार

  • भारतात तृतीयपंथींना 1994 मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला होता.
  • तीस वर्षांपूर्वी 1998 ते 2003 – या काळात मध्य प्रदेशमधील भोपाळमधून शबनम मौसी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी – खासदार म्हणून निवडून आलेल्या  होत्या.

 गरुड शक्ती लष्करी सराव 2024

  • भारत-इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस सराव गरुड शक्ती 2024 च्या 9 व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी 25 जवानांचा समावेश असलेला भारतीय लष्कराचा तुकडी इंडोनेशियातील सिजंटुंग, जकार्ता येथे रवाना झाली.
  • हा सराव 1 ते 12 नोव्हें. 2024 या  कालावधीत आयोजित केला जाईल .
  • भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) च्या सैन्याने केले आहे आणि इंडोनेशियन स्पेशल फोर्सेस कोपसस द्वारे 40 जवानांचा समावेश असलेल्या इंडोनेशियन तुकडीचे प्रतिनिधित्व केले जात आहे.

उद्दिष्ट

  • गरुड शक्ती 24 या सरावाचे उद्दिष्ट दोन्ही बाजूंना एकमेकांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे, दोन्ही सैन्याच्या विशेष दलांमधील परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे आहे.
  • या सरावाची रचना द्विपक्षीय लष्करी सहकार्य विकसित करण्यासाठी आणि चर्चा करून आणि सामरिक लष्करी कवायतींच्या तालीमद्वारे दोन सैन्यांमधील संबंध मजबूत करण्यासाठी करण्यात आली आहे.
  • या सरावामध्ये विशेष ऑपरेशन्सचे नियोजन आणि अंमलबजावणी, विशेष सैन्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी अभिमुखता, शस्त्रे, उपकरणे, नवकल्पना, डावपेच, तंत्र आणि कार्यपद्धती यावरील माहितीचे आदान-प्रदान यांचा समावेश असेल.
  • संयुक्त सराव गरुड शक्ती 24 मध्ये जंगलाच्या प्रदेशात विशेष सैन्याच्या ऑपरेशनचा संयुक्तपणे सराव करणे, दहशतवादी तळांवर हल्ले करणे आणि लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या जीवनशैली आणि संस्कृतीची अंतर्दृष्टी प्राप्त करण्याव्यतिरिक्त मूलभूत आणि आगाऊ विशेष सैन्य कौशल्ये एकत्रित करणारा प्रमाणीकरण सराव यांचाही समावेश असेल.
  • या सरावाची ही 9 वी आवृत्ती होती.या सरावाची पहिली आवृत्ती 2012 मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती.

कोल इंडिया चे 50 व्या वर्षात पदार्पण

  • भारताची कोळश्याची गरज पूर्ण करताना ऊर्जा क्षेत्रालाही  बळकटी देणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (CIL) या सरकारी मालकीच्या कंपनीने 1 नोव्हेंबर 2024 रोजी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
  • राष्ट्रीयीकृत कोकिंग कोल (1971) व नॉन कोकिंग खाणी (1973) यांची शिखर होल्डिंग कंपनी या नात्याने CIL 1 नोव्हेंबर 1975 रोजी स्थापन झाली.
  • CIL च्या स्थापना वर्षात म्हणजे 1975-76 साली झालेल्या 89 मिलियन टन उत्पादनापासून सुरुवात करणाऱ्या या महारत्न कोळसा कंपनीने कोळसा मंत्रालयांतर्गत कार्यरत असताना आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6 मिलियन टन म्हणजे 8.7 पट अधिक उत्पादनाचा टप्पा पार केला आहे.
  • CIL चे 80% कोळसा उत्पादन अतिशय रास्त दराने वीज उत्पादक क्षेत्राला दिले जाते आणि अशा रीतीने नागरिकांना वाजवी दरात वीज पुरवठा होतो आहे.
  • राष्ट्रीयीकरणानंतरच्या काळात असलेली 75 लाख कर्मचारी संख्या आता एक तृतीयांशाने घटून फक्त 2.25 लाख इतकी उरली आहे, तरीही उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
  • CIL चा  गेल्या 5 दशकांचा प्रवास अनेक महत्वाच्या घटनांनी अंकित झालेला आहे.
  • कंपनीने अनेक आव्हाने व बदल तसेच  कसोटीचे प्रसंग व समस्या समर्थपणे पेलत अपेक्षेप्रमाणे कार्यक्षमता दाखवली आहे.
  • मुळात फक्त कोळसा उत्पादन करणाऱ्या कोल इंडियाने आता सौर ऊर्जा, पिटहेड ऊर्जा केंद्रे, कोळशाचे वायूत रूपांतरण व अतिमहत्वाच्या खनिजाचे उत्पादन करून राष्ट्रहिताला हातभार लावला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *