नवीन वर्ष (2025) सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित
संरक्षणमंत्रालयाने नवे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे. सायबरअन् अवकाश युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक्स, हायपरसोनिक टेक्नोलॉजी यांसारख्या नव्या क्षेत्रांवर तसेच वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानावर नव्या वर्षात लक्ष केंद्रित केले जाईल. लष्कराचेआधुनिकीकरण, लष्करी क्षमतेचा विकास आणि अधिग्रहण प्रक्रियेत सुलभता आणण्यासह इतर मुद्द्यांवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्याप्रगत, प्रत्येक प्रकारचे आणि स्तरावरचे युद्ध हाताळण्याची क्षमता असलेले सैन्यबळ तयार करण्याचे लष्कराचे उद्दिष्ट आहे. संरक्षणक्षेत्राची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहे. दशकभरापूर्वीदोन हजार कोटी रुपयांवर असलेली भारताची संरक्षण निर्यात आता 21 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. वर्ष2029 पर्यंत निर्यातीचा आकडा 50 हजार कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य आहे. आर. वैशाली कांस्य पदकाची मानकरी कोनेरूहम्पीनंतर भारताच्या आर. वैशालीने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली आहे....
Read More