Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अहमदनगर शहराचे नाव आता ‘अहिल्यानगर’

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले असून अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य करत अहमदनगरचे नाव बदलले आहे.

अधिक माहिती
• अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचेही नाव बदलण्यात आले असून आता या तालुक्याला ‘राजगड’ असे नाव देण्यात आले आहे.
• नामांतराचा हा प्रस्ताव आता पुढील मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला जाणार आहे.
• केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार गाव व शहरांचे नाव बदलण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत.
• कोणत्याही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गाव किंवा शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आल्यास केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर शासनामार्फत नामांतराची अधिसूचना करण्यात येते.

अलीकडेच काही महत्वाच्या ठिकाणांची बदललेली नावे
• अहमदनगर – अहिल्यानगर
• वेल्हे – राजगड
• औरंगाबाद – छत्रपती संभाजीनगर
• उस्मानाबाद जिल्हा – धाराशिव
• अलाहाबाद – प्रयागराज
• राजपथाचे – कर्तव्यपथ
• फैजाबाद – अयोध्या
• गुरगाव – गुरूग्राम

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *