केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष, राजीव गांधी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात ज्यांचे या क्षेत्रातील योगदान विशेष नावाजले गेले, असे ‘अॅप्लॅब इंडिया’ या विख्यात कंपनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रभाकर देवधर यांचे मुंबईत वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात भारताला नावारूपाला आणण्यात श्री. देवधर यांचा महत्त्वाचा वाटा होता.
अधिक माहिती
● या क्षेत्रात मराठी माणसाची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवण्याचे श्रेय श्री. देवधर यांस निर्विवादपणे दिले जाते.
● या विषयाशी संबंधित तब्बल 650 उपकरणे, उत्पादने त्यांनी निर्मिली.
● राष्ट्रीय स्तरावर त्यांचे कार्यकर्तृत्व विविध पुरस्कारांनी गौरवले गेले.
● श्री. देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील नूतन मराठी विद्यालयात झाले.
● त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यांनी सुरुवातीला टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) अधिपत्याखालील प्रयोगशाळेत ‘मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स’ विभागात काम केले.
● त्यांनी 1962 मध्ये संशोधन आणि विकास क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळा स्थापन केली.
● त्यानंतर 1964 मध्ये त्यांनी संशोधनावर आधारित ऊर्जाविषयक यंत्रांचे उत्पादन आणि विक्री सुरू केली.
● श्री. देवधर यांनी स्थापन केलेल्या ‘अॅप्लॅब’ या कंपनीने बँकांसाठी एटीएम आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठीची यंत्रे, स्वयंचलित पेट्रोलपंप आणि केबलमधील दोष शोधणारी यंत्रे विकसित केली.
● औद्याोगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबरोबरच त्यांनी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे अध्यक्षपद 1986 ते 1988 या काळात भूषविले.
● तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागार म्हणून 1988 ते 199प दरम्यान त्यांनी काम पाहिले.
● ते 1992-93 भारत सरकारच्या प्रसारण समितीचे अध्यक्ष होते.
● कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि दूरचित्रवाणी या माध्यमांचा वापर केला.
● जेरुसलेम (इस्रायल) येथे १९९६ मध्ये भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.
● तसेच जागतिक मराठी अकादमीचे ते 1997 ते 1999 दरम्यान अध्यक्ष होते.
● त्याच कालावधीत ते महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचेही अध्यक्ष होते.
● इलेक्ट्रॉनिक्स विषयावर भाषणे आणि लेखांद्वारे प्रबोधन करणाऱ्या श्री. देवधर यांनी 1979 मध्ये एक पुस्तक लिहिले.
● त्याचबरोबर दिल्लीतील अनुभवावर आधारित ‘कॅपिटल पनिशमेंट’, दूरचित्रवाणीचा शैक्षणिक उपयोग करण्यासाठीचे ‘थर्ड पेरेंट’, आणि ‘इज एनिवन आउट देअर’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.


