Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

झारखंडमध्ये पन्नाशीतच मिळणार निवृत्तिवेतन

झारखंडमध्ये आता 50 व्या वर्षीच निवृत्तिवेतन मिळणार आहे. “राज्यातील आदिवासी आणि दलितांना वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्तिवेतनाचा (पेन्शन) लाभ मिळेल” अशी घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली.

अधिक माहिती
• झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रांचीतील मुरादाबाद मैदानावर कार्यक्रम आयोजित केला होता.
• आदिवासी व दलितांना वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्तिवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
• त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे व त्यांना 60 वर्षांनंतर नोकऱ्या मिळत नाहीत.
• झारखंडची निर्मिती 2000 मध्ये झाल्यानंतर 20 वर्षांत केवळ 16 लाख लोकांना पेन्शनचा लाभ मिळाला होता.
• सोरेन सरकारने चार वर्षांत 36 लाख लोकांना पेन्शन दिली आहे. त्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्ती, 18 वर्षांवरील विधवा आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांचा समावेश आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *