तेलंगण सरकारचा – ‘गुगल‘ बरोबर करार
- तेलंगणमधील विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कार्यक्षमता वाढविण्यासाठी येथील सरकारने गुगल कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे.
- कृषी, वाहतूक, शिक्षण, शाश्वत विकास आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये ‘एआय’च्या माध्यमातून सुधारणा घडवून आणण्याचा यामागे उद्देश आहे.
- मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
- या करारानुसार, कृषी क्षेत्रातील काही अडचणी सोडविण्यासाठी, वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी ‘गुगल’ मदत करणार आहे.