माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना केंद्र सरकारतर्फ देण्यात येणाऱ्या पद्म सन्मानांची घोषणा करण्यात आली.
एकूण 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मविभूषण (एकूण 5)
• वैजयंतीमाला बाली (कला, तमिळनाडू)
• कोनिडेला चिरंजीवी (कला, आंध्र प्रदेश)
• एम. वेंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा, आंध्र प्रदेश)
• बिंदेश्वर पाठक (सामाजिक सेवा, बिहार) मरणोत्तर
• पद्या सुब्रह्मण्यम (कला, तमिळनाडू)
पद्मभूषण (एकूण 17 – महाराष्ट्र 6)
• होर्मुसजी एन. कामा (साहित्य, शिक्षण-पत्रकारिता, महाराष्ट्र)
• अश्विन बालचंद मेहता (वैद्यकीय, महाराष्ट्र)
• राम नाईक (सार्वजनिक सेवा, महाराष्ट्र)
• दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त (कला, महाराष्ट्र)
• प्यारेलाल शर्मा (कला, महाराष्ट्र)
• कुंदन व्यास (साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता, महाराष्ट्र)
पद्मश्री – (110 – महाराष्ट्र 6)
• उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, महाराष्ट्र)
• मनोहर कृष्ण डोळे (वैद्यकीय, महाराष्ट्र)
• झहिर काझी (साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र)
• चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (वैद्यकीय, महाराष्ट्र)
• कल्पना मोरप्रिया (उद्योग, महाराष्ट्र)
• शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर (सामाजिक सेवा, महाराष्ट्र)


