- भारत आणि बांगलादेश यांनी विविध नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी आणि सागरी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी केली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये या करारांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
- बांगलादेशच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या.
- दोन्ही देशांमधील प्रमुख करारांमध्ये डिजिटल क्षेत्रात मजबूत संबंध प्रस्थापित करणे, हरित भागीदारी, रेल्वे वाहतूक इ. समावेश आहे.